HW News Marathi
महाराष्ट्र

पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा; राऊतांचा सोमय्यांवर गंभीर आरोप

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकाद भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहे. सोमय्यांनी पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. गेल्या काही वर्षात सोमय्यांनी अमित शहा नावे धमकावून सात हजार कोटी जमा केल्याचा आरोपही राऊतांनी आज (१७ फेब्रुवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहेत. तसेच भाजप सरकारच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या घोटाळ्यात अमोल काळे आणि विजय ढवंगाळे या दोघांची केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. या घोटाळेबाजांच्या बँक खात्यातील पैसे कुठे गेले, विना टेंडर कोणी यांना कंत्राट दिले?,असे सवाल राऊतांनी उपस्थित केले आहेत. 

राऊत म्हणाले, “सोमय्यांनी पवई पेरूबाग पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील ट्रक भर कागदपत्र माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. आणि सोमय्यांच्या विरोधात माझ्याकडे आतापर्यंत २११ प्रकरणे जमा झाली आहेत. सोमयांनी अमित शहा आणि फडणवीसांच्या नवाचा वापर करून साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा वापर करत लोकांकडून वसुली केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मी हे सर्व प्रकरण आजच इडीच्या ऑफिसला देणार असून मी आज मुख्यमंत्र्यांना भेटून हा सर्व गैरव्यहार उघड करणार आहे.

राऊतांची चंद्रकांत पाटलांना धमकी

सोमय्यांनी राऊतांवर केलेल्या आरोपवर चंद्रकांत पाटलांनी प्रसार माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली होती. यावरून राऊत म्हणाले, ” चंद्रकांत पाटील वैगेरे भाजपचे काही नेत्यांनी मध्ये पडत आहेत. त्या नेत्यांनी मध्ये पडू नये, अन्यथा उघडे पडतील. उगाच सोमय्यांच्या प्रकरणात तुम्ही पडू नका, महाराष्ट्राचे लोक सोमय्यांची धिंड काढणार आहेत. तुम्ही यात पडलात तर तुमचेही कपडे काढतील. त्यामुळे या प्रकरणात पडू नका, असा धमकी वजा इशारा त्यांनी चंद्रकात पाटलांना दिला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला फक्त जनताच प्रश्न विचारु शकते | मुख्यमंत्री फडणवीस

News Desk

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला, विनोद पाटलांचा आरोप

News Desk

पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील

News Desk