HW News Marathi
महाराष्ट्र

तो पर्यंत अच्छे दिन येणार नाहीत !   

अशोक चव्हाणांची सरकारवर टिका

औरंगाबाद – राज्यातील भाजपच्या सरकारची ३ वर्षे ही निराशजनक आणि फक्त घोषणाबाजीचीच राहीली आहेत. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार जो पर्यंत पाय उतार होत नाही तो पर्यंत जनतेला अच्छे दिन येणार नाहीत असे ठाम मत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील भाजप सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते.

सरकार जरी युतीचं असलं तरी ते भाजपचचं वाटतं. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात नेहमीच कुरबूरीचं राजकारण पहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीत गप्प राहतात आणि बाहेर आले की सरकारच्या विरोधात बोलतात. त्यामुळं शिवसेनेवर लोकांचा अजिबात विश्वासच राहिलेला नाही असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टिका करताना ‘मेक इन इंडिया’चा फज्जा उडाला आहे. हे ‘मेक इन’ नव्हे ‘फेक इन इंडिया’ झालं आहे अशी टिका त्यांनी केली. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक इतर राज्यांत गेली आहे त्या बाबत चिंता व्यक्त करताना त्याला सध्याचे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

News Desk

राज्यातील साखर कारखाने केंद्रामुळेच वाचले,चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन!  

News Desk

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, NDRF पथकांना सज्ज ठेवा! – मुख्यमंत्री

Aprna