HW News Marathi
देश / विदेश

पार्थ पवारांचं नाव घेत पडळकरांचा अजित पवारांवर घणाघात

मुंबई । “ज्यांचं निवडणुकीत डिपॉझिट जप्त होतं अशांची मिडियाकडून इतकी नोंद का घेतली जाते”, असे बोचरा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना डिवचले आहे. मात्र, अजित पवार यांच्या या टिकेला आता पडळकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “लोकसभेत पार्थ पवार पडले तेव्हा तुमची लायकी नव्हती का?” असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते शनिवारी (१३ फेब्रुवारी) पंढरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्यामुळे पडळकर आणि पवार यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता आहे.

जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून पडळकर आणि पवार यांच्यातील वाद उफाळला आहे. यावेळी, पडळकरांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती ज्याला अजित पवारांनी घणाघाती प्रत्युत्तर दिले होते. “शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी व जातीयवादी माणसाने अहिल्यादेवींच्या पुतळ्याला हात लावू नये. या पुतळ्याचं अनावरण करू नये. अहिल्यादेवी प्रजाहितदक्ष होत्या. पवार हे नेमके प्रजेच्या विरोधी आहेत. वाईट प्रवृत्तीचे आहेत. पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणे म्हणजे अहिल्यादेवींचा अपमान आहे”, अशी टीका पडळकरांनी केली होती.

काय म्हणाले होते अजित पवार?

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) पुण्यात म्हणाले होते की, “अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही ? उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही मला पत्रकार परिषदेत त्यांच्याबद्दल प्रश्न विचारताय ? एवढं काय महत्त्व देताय ?”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

News Desk

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, आयआयटीचे ३५ विद्यार्थ्यांसह ४५ नागरिक बेपत्ता

swarit

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचा वरचष्मा..

News Desk