HW News Marathi
महाराष्ट्र

एकीकडे भाजप-मनसे युतीला नकार, तर दुसरीकडे भाजपचे आमदार मनसे कार्यालयात!

मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं आहे. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत. अशातच नवी घडामोड पुढे आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनसे कार्यलायाला भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.

भाजप-मनसेत जवळीक वाढत असल्याचे पुन्हा सिद्ध

जिथे राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील भेटायचे तिथे आता कार्यकर्तेही एकमेकांना भेटू लागले आहेत. गोपीचंद पडळकर हे मानखुर्दला आले असता त्यांनी मनसे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जगदीश खांडेकर यांनी पडळकर यांचे स्वागत केले. या भेटीत दोघांमध्ये स्थानिक राजकीय मुद्द्यांवर चर्चाही झाली. मात्र ही सदिच्छा भेट असली तरी भाजप-मनसेत जवळीक वाढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

राज ठाकरेंसोबत युती नाही

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईला भेट झाली आहे. त्यांच्या या भेटीवरून राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप-मनसे युती अशी चर्चा एकीकडे रंगात असताना, मनसे सोबत नाही असं मोठा विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक

देवेंद्र फडणवीस यांनी मनसे सोबत युती करणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षात फरक इतकाच आहे, त्यांची परप्रांतियांशी जी भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नाही. त्यांचा हिंदुत्वाचा आणि आमचा हिंदुत्वाचा मुद्दा हा समान धागा आहे. पण परप्रांतियाचा मुद्दा हा वेगळा आहे. भेट होणं हे स्वाभाविक आहे, त्यात अन्य काही नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाही

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटींमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपलं मत मांडलं आहे, “मला वाटतं महाराष्ट्रात कुणी कुणाला भेटावं यावर बंधणं नाहीत. राजकारणात जर आणि तरच्या मुद्द्याला स्थान नसतं. परप्रांतियांबद्दल त्यांच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. त्यांनी स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका आणि आमचं हिंदुत्व हा समान धागा आहे. मात्र, अद्यापही दुसरा जो मुद्दा आहे त्याचं निराकरण होत नाही तोवर जर तरला काही महत्व नाही, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात पुढे केला जाईल अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर विचारलं असता. बाळा नांदगावकर यांना तसं वाटलं असेल आणि ते स्वाभाविक आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शहा-मोदींकडे आमचं कामच नव्हतं’, चंद्रकांत पाटलांचं पत्रकार परिषदेत विधान!

News Desk

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे, कंगणाचे मुंबईतून निघतानाचे ट्विट

News Desk

नारायण राणेंना पोलिसांकडून अटक!

News Desk