HW News Marathi
महाराष्ट्र

‘रोहित पवार हे शरद पवारांचं सुधारित व्हर्जन; तेही पुढच्या ५ पिढ्या घालवतील मातीत’

मुंबई। भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे विविध कारणांवरून पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकांमुळे गोपीचंद पडळकर हे कायमच चर्चेत असतात. दरम्यान, आता गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटूंबातील आणखी एका सदस्यावर टीका केली आहे.

पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कामगिरीवर टीका करतानाच ते शरद पवारांचे सुधारित व्हर्जन असून शरद पवारांप्रमाणेच ते पुढील पिढयांना मातीत घालवतील असा घणाघात केला आहे. पडळकर आज कर्जतच्या दौऱ्यावर होते. श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. तर, ‘रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा आरोप पडळकरांनी केलाय.

‘आघाडी सरकार आरक्षणविरोधी, मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत’

राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असा गौप्यस्फोट करतानाच सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर चौंडी येथे आले होते. अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा आरोप केला. राज्य सरकार ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षणावरून सरकारचं मोठं षडयंत्र आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. हे सरकार निष्क्रीय आहे. कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही. सरकारमधील मंत्रीच आरक्षणावरून वाद पेटवत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

काँग्रेसच्या नेत्यांवरही सडकून टिका

काँग्रेसही सत्तेसाठी लाचार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राचीही ते दखल घेत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. पदोन्नतीतील आरक्षणासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याचं काय झालं? काँग्रेस नेत्यांना कोणतीही लाज राहिली नाही. बारामतीच्या काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते नुसती मान डोलवत आहेत. यांचं सरकारमध्ये काहीच चालत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्यांच्या खाद्याने मोठं नुकसान झाल्याची तक्रार देखील एका तरुणाने आपल्याकडे केली असल्याचं पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोण नारायण राणे माहित नाहीत!”, संजय राऊतांचा नारायण राणेंवर हल्ला

News Desk

शरद पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

News Desk

“नाव परमविरासारखं आणि संपत्ती हडपतो बकासुरासारखी”, राष्ट्रवादीचा टोला

News Desk