HW News Marathi
महाराष्ट्र

‘जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार’, गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका!

सांगली। बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. इतकंच नाही तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देखिल देण्यात आल्या आहेत.

जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार

एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. मला जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी बैलगाडा शर्यत भरवणारच, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं

येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे

शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे कालचे भाषण म्हणजे केवळ पोकळ घोषणा, विनायक मेटेंचा वार

News Desk

रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, ‘पण….’ देवेंद्र फडणवीस!

News Desk

दोन्ही कर्जमाफी योजनांमधून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? – नाना पटोले

Aprna