HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला आहे. तर आता महाराष्ट्र पाठोपाठ तामिळनाडू सरकारनेही ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. तामिळनाडूमध्ये १२ जिल्ह्यांना या लॉकडाउनमधून दिलासा देण्यात आलेला नाही. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा बंदच राहणार असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले आहेत.

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ३१ मेनंतर पुढील निर्णय सूचित करण्यात येईल, असे राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात ३१ मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले असून आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन वाढवणार आहोत. १८ मे पूर्वी लॉकडाऊन ४ ची माहिती दिली जाईल, असे मोदींनी सांगितले होते.

देशात लॉकडाऊन असा वाढवला कालावधी

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने २५ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषला केली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र, तरी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम असल्याचे पाहून हा लॉकडाऊन पुन्हा १९ दिवसांसाठी वाढवण्यात आला. या लॉकडाऊनचा कालावधी ३ मे ला संपणार होता. मात्र, आज पुन्हा दोन आठवड्यांसाठी हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ मे पासून १७ मेपर्यंत राहणार आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज! – मुख्यमंत्री

News Desk

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्याची प्रणाली विकसित करणार !

News Desk

#CycloneNisarga : चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

News Desk