HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांची सही

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांकडे राजीनामा पाठवण्यात आला. अखेर राज्यपालांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नसल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. यावर आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर राज्यपालांकडे पोहचलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘२०१९ ला सरकारने केलेली तशी मदत करा’, कोल्हापूरातील पुरग्रस्तांची फडणवीसांकडे मागणी

News Desk

समाज,देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत काम करणाऱ्या कंपन्यासह संस्था कौतुकास पात्र! – मुख्यमंत्री

Aprna

इमारतीचा एका इंचचे बांधकाम अनधिकृत ठरले…!

Aprna