HW News Marathi
महाराष्ट्र

आज राज्यात ग्रामपंचायत मतदानाची रणधुमाळी!

मुंबई | आज (१५ जानेवारी) राज्यभरात जवळपास १४ हजाराहून अधिक ग्रामपंतायतींसाठी मतदान पार पडत आहे. त्यासाठी गावागावात मतदान केंद्र सजली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था आधीच करण्यात आलीय. त्यानुसार अनेक गाड्या आता गावात दाखल होऊ लागल्या आहेत. तसंच वयस्कर मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक गावात उमेदवारांनी मतदान यंत्राची पूजा करुन, मतदानाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकारनं पहिल्यांदाच सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर पार पडणार असल्याचं जाहीर केलं आहे. म्हणजे यापूर्वी ८ जिल्ह्यांत आरक्षणाची सोडत जाहीर झाली होती. ती सोडत रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलं होतं. मात्र, त्यानंतरही काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ती दूर व्हावी म्हणून सरकारनं १६ डिसेंबर २०२०ला नव्यानं एक जीआर काढून, आधी झालेली सरपंच आरक्षणाची सोडत रद्द केलं. त्यामुळे आता निवडणूक पार पडल्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही | धनंजय मुंडे

News Desk

धनगर समाजाचे प्रश्न, समस्या मार्गी लावणार! – मुख्यमंत्री

Aprna

मनसे नगरसेवकाने फोडली पुणे महापालिकेच्या उपायुक्तांची गाडी

News Desk