HW News Marathi
Covid-19

किराणा दुकानांच्या वेळेत पुन्हा बदल?, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई | राज्यात मुख्यमंत्री कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळेतही पुन्हा बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या (१९ एप्रिल) बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्याच्या निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच खुली राहणार आहेत. या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारला विनंती आहे की, अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा युक्तिवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.

महाराष्ट्र उद्योग व व्यापारी चेंबरनेदेखील सध्याच्या निर्बंधात बदल करण्याची मागणी केली आहे. सध्याचे निर्बंध कायम ठेवायचे असल्यास वीज शुल्कात सवलतीची गरज आहे. एखाद्या कार्यालय किंवा दुकानातील कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याचा भार मालकावर येण्याऐवजी त्या कर्मचाऱ्याचे उपचार ईएसआयसीच्या माध्यमातून व्हायला हवे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

राज्यात संचारबंदी लागू होऊनही अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव तसा आटोक्यात येताना दिसत नाही. यावर लॉकडाऊन आणखी कठोर करणे हाच एकमेव उपाय आहे, असा मतप्रवाह ठाकरे सरकारमध्ये आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत यासंदर्भातही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्यामुळे आता केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील लस उत्पादकांसोबत चर्चा करणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाचीही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी, अनिल परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

Sputnik V लसीची पहिली बॅच भारतात दाखल!

News Desk

स्वयंशिस्तीचे पालन केल्यामुळे राज्यातील ‘या’ गावात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

News Desk