HW News Marathi
महाराष्ट्र

‘संप्रदायिकतेचं विष पेराल तर हा अस्लम शेख…’; पालकमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

मुंबई | मुंबईतील मालाड येथे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलावरून सध्या राज्यात मोठा वाद सुरू झाला आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान हे नाव दिल्यामुळे भाजप आणि बजरंगी दलाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आता स्वतः अस्लम शेख यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना इशारा दिला आहे.

अस्लम शेख यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर टिपू सुलतान प्रकरणी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी मालाड येथील मैदानाला पूर्वीपासूनच टिपू सुलतान म्हणून ओळखले जाते असे सांगितले आहे. तसेच याआधी या नावावर आक्षेप घेतला गेला नाही, तर मग आताच विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच यावेळी ते असेही म्हणाले की यापुढे जिथे-जिथे सांप्रदायिकतेचं विष पेरलं जाईल तिथे-तिथे मी एखाद्या पर्वतासारखा उभा राहिन.

काय आहे अस्लम शेख यांची पोस्ट?


जी मालवणी मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. सर्व धर्मांमधील एैक्य आणि सलोखा अबाधित ठेवला. गेल्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही जातिय दंगल घडू दिली नाही. आज त्याच सुंदर मालवणीवर सांप्रदायिकतेचा चिखल फेकून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती करीत आहेत.

मालवणीमधील असा एक भूखंड जिथे फक्त उकीरडाच असायचा. त्या भूखंडाचा सदुपयोग व्हावा. तिथे उद्याचे खेळाडू घडावेत या उदात्त हेतूने तिथे मी क्रीडा सुविधा निर्माण केल्या. फुलपाखरांचं उद्यान तयार केलं. व्यायामशाळा बांधली. आज या विकासकामांवर कोणीही बोलायला तयार नाही. मात्र एका नावाचं निमित्त करुन या मालवणीच्या मातीत सांप्रदायिकतेचं विष पेरलं जात आहे.

वर्षानुवर्षे या मैदानाचा उल्लेख टिपू सुलतान मैदान असाच केला जात आहे. मात्र इतक्या वर्षांमध्ये यावरती कोणाला आक्षेप घ्यावा असं वाटलं नाही. आज या मैदानात झालेल्या विकासकामांमुळे या मैदानाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाल्यानंतर धर्मांध शक्तींना पोटदुखी सुरु होण्याच कारण काय..?

रमजानच्या महिन्यात हिरवा शालू नेसणारी मालवणी, गणेशाच्या आगमनावेळी भगव्याची उधळण करणारी मालवणी, भारतरत्न डॉं बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जय भीम च्या गर्जनेने आसमंत दणाणून सोडणाऱ्या ह्या मालवणीच्या सौंदर्यावरती मी एक ओरखडा देखील ऊठू देणार नाही.

मी या धर्मांध शक्तींना एवढच सांगू इच्छितो की, तुम्ही मला नाही तर मालाड- मालवणीकरांच्या अस्मितेला ललकारलं आहे. मालवणीची जनता शांत, संयमी आहे पण ती भित्री नक्कीच नाही.

आता तुम्ही जर मला मैदानात उतरायला भाग पाडलच आहे तर एक गोष्ट सांगतो, आता हा विषय पक्षीय राहिला नाही. तुम्ही राजकारणाची अत्यंत खालची पातळी गाठली आहे. यापुढे तुम्ही जिथे-जिथे सांप्रदायिकतेचं विष पेरायला जाल तिथे-तिथे हा अस्लम शेख एखाद्या पर्वतासारखा तुमच्या मार्गात उभा राहिल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी २ कोटी मागितले!

News Desk

जाणून घ्या… राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देते गेलेल्या नेत्यांचे निवडणुकीत नेमके काय झाले

News Desk

NSEL घोटाळ्याप्रकरणी ED ची प्रताप सरनाईकांवर कारवाई

Aprna