HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाचा विषय ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठीच, गुलाबराव पाटलांचा टोला

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना वाद हा शिगेला पोहोचला आहे. यावरुन “ठाकरे सरकारसाठी कोरोना हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. काही लोकांनी निव्वळ बदनामीसाठी कंगना आणि सुशांतचा मुद्दा पुढे आणला” अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. “सरकारसाठी कोरोना हाच महत्वाचा प्रश्न आणि मुद्दा आहे. कोरोनाचा सामना कसा करायचा यासाठी ठाकरे सरकार प्रय़त्न करत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.

शिवभोजन दिले जाते आहे. मात्र काहींना हे पाहावत नाही आहे. त्यामुळेच कंगनाच्या मुद्द्याचे पिल्लू सोडण्यात आले आहे. हा ठाकरे सरकारला विनाकारण बदनाम करण्याचा प्रय़त्न आहे. कोरोनावर उपाय योजना सुरु असताना कंगनाचा मुद्दा कुणी पुढे आणला ते शोधा. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मुंबईला बदनाम करण्याचा हा डाव आहे” अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे… उत्तरे नेत्यांची या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आम्हाला ना कंगनाशी घेणंदेणं आहे, ना सुशांतशी. कंगनाचा मुद्दा कुणीतरी मुद्दाम समोर आणला. दीड लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची कधी सीआयडी, सीबीआय चौकशी झाली नाही. शेतकरी आत्महत्येबाबत भाजपाने कधीही प्रश्न विचारला नाही. सुशांत सिंह राजपूत, कंगना हे हिरो हिरोईन आहेत म्हणून भाजपाला महत्त्वाचे वाटले का? शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न विचारले असते तर मी भाजपाला सलाम केला असता असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. खास करुन शिवसेना आणि कंगना यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. याच मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला गेला असता जाणीवपूर्वक कुणीतरी कंगनाचा मुद्दा पुढे आणला असा आरोप भाजपाचं नाव न घेता केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

Aprna

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

“भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?” देशमुख प्रकरणावरून राऊतांचा सवाल!

News Desk