HW News Marathi
महाराष्ट्र

‘संभाजी राजेंना अटक करा!’, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

नांदेड | खासदार संभाजी राजे यांनी मराठा क्रांती मूक मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्च्यासाठी हजारो नागरिक उपेक्षित होते. कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे, आणि अशातच आयोजित मोर्च्यामुळे कोरोना निर्बंधांचं उल्लंघन झाला आहे. या कारणामुळे छत्रपती संभाजी राजेंना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

काय म्हणाले सदावर्ते?

गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंच्या अटकेची मागणी केली आहे. ते म्हणाले, “खासदार संभाजी राजे यांनी कोरोना काळात मोर्चा काढला. न्यायालयाने असंविधानिक ठरवलेल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी मोर्चा काढला. उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या काळात असे मोर्चे काढू नयेत, असे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या संभाजीराजेंचे हे गुन्हेगारी कृत्य आहे. त्यामुळे त्यांना तातडीने अटक करायला हवी. याचबरोबर नक्षलवाद्यांच्या संदर्भात संभाजीराजेंनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करावी.

संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?

गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजी राजेंवर चांगलाच वार केला आहे. ते म्हणाले, ” मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडचे पालकमंत्री आहेत. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांनी याबाबत निर्देश द्यायला हवेत. अजित पवारांच्या घरासमोर लोक निदर्शने करतात त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल होता. त्यांना 15 दिवस तुरुंगात टाकले जाते. संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? नांदेडमध्ये बेकायदा काढलेला मोर्चा पांगवा. मोर्चाला झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत अन्यथा पुढील परिस्थितीला ते जबाबदार राहतील”, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.

संभाजी राजे काय म्हणाले?

खासदार समभुज राजे यांनी काल(२० ऑगस्ट) मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. यावेळी ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज हा पुढारलेला आहे, असे सांगत आरक्षण रद्द केले आहे. मग आता काय करायचे, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करत आहे. मी देखील केली आहे, पण त्याने काही होणार नाही. त्यासाठी आधी मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागसलेपण सिद्ध होणे गरजेचे आहे. ही जबाबदारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तुमचे नांदेडकर यांची आहे, आज ते कुठे दिसत नाही. त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे, राज्य सरकारने जबाबदारी घ्यावी”, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या प्रकरणांमूळे महाराष्ट्र सरकार अस्थिर होऊ लागली तर आधीच केंद्रातील सरकार पडेल – संजय राऊत

News Desk

‘फक्त महिला घरी असताना सीबीआयचे अधिकारी घरात कसं काय शिरले?’, सुप्रिया सुळेंचा सवाल

News Desk

अपयश लपण्यासाठी हा छाती बडवण्याचा प्रकार आहे…

News Desk