HW News Marathi
देश / विदेश

‘उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत काय घडलं?’ संजय राऊत म्हणाले….

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांची काल(२० ऑगस्ट) बैठक पार पडली होती. या बैठकी नंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. नक्की काय घडलं या बैठकीत असा विचार सगळ्यांचाच मनात आला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बैठकीचं स्पष्टीकरण दिलं आहे.

जर सत्ता समिप दिसत असेल…

संजय राऊत यांनी या भेटीबद्दल सगळ्यांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, “काल(२० ऑगस्ट) सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत १९ पक्षांचे नेते उपस्थित होते. स्वतः मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला. तो म्हणजे आज आपल्या समोर सत्ता नाही. पण आज आपण एकत्र आलोय. पण यानंतर जर सत्ता समिप दिसत असेल किंवा सत्तेची खुर्ची दिसत असेल, तेव्हा सुद्धा आपण सर्वांनी एकत्र राहील पाहिजे”, असं ते म्हणाले आहेत.

तालिबानला पाकिस्तान आणि चीन चा पाठिंबा

अफगाणिस्तान मध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याने संपूर्ण देश हळहळला आहे. अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्षामुळे चर्चेत आलेल्या तालिबानबाबतही संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, तालिबान वाढत आहे हे सत्य आहे. तसेच तालिबानला पाकिस्तान आणि चीन चा पाठिंबा आहे हे देखील सर्वाना माहीत आहे. तेव्हा भारत सरकारने या शत्रू देशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.

येणाऱ्या निवडणुकांची तयारी

काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी नेते हजर होते.

राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ

या बैठकीत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले गेले होते. केंद्र सरकारने सहकार हे नवीन खाते स्थापन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी दिली आहे. केंद्राची ही कृती म्हणजे राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.

बिगरभाजप राज्यांना लसपुरवठा करण्यात केंद्र सरकार पक्षपात करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचाही उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट, १ जवान शहीद तर ७ जण जखमी

News Desk

मनी लाँड्रिंग ॲक्टच्या घटनात्मक वैधते विरोधात रॉबर्ट वाड्राची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

swarit

“वेळ पडली तर बेळगावात विरोधीपक्षाच्या नेतृत्वात आंदोलन करु, पण ते येतील का ?” 

News Desk