HW News Marathi
महाराष्ट्र

Hasan Mushrif Exclusive : राज्यभरात शिवसेना-भाजपची डाळ गळणार नाही !

कोल्हापूर | राज्यभरात भाजप-शिवसेनेची डाळ शिजणार नाही, असा दावा कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. मुश्रीफ यांनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल केला. “कागलच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८ जागा, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आम्ही आणणार आमचे सगळ तिरंगी होणार, असा विश्वास मुश्रीफ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. भाजपची स्टाईल आहे की, त्यांचे ऐकले नाही की ईडी लावयचे चौकशी लावायचे, लोक आता पूर्णपणे संतप्त झाले आहेत. या बद्दल आता संतापाची लाट आली आहे. त्यामुळे यावेळी आता राज्यभरात भाजप-शिवसेनेची डाळ शिजणार नाही, असा दावा मुश्रीफ यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

शिवसेनेचे उमेदवार तुमच्या सांगण्यावरून त्यांना उमदेवारी देण्यात आली, अशा चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगल्या असल्याचा प्रश्न एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी मुश्रीफ यांना केला. यावर ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे माझे ऐकतात, आवडतय, असा उपरोधत्त्मक टोला लगावत, उपस्थितीतांमध्ये हास्यकल्लोळ माजला. मुश्रीफ तुमच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार, त्याचबरोबर अपक्ष उमेदवार समरजीत घाडगे सुद्धा आहेत. तर तुम्हाला दोघांपैकी कोणाचे आवाहन जास्त वाटते, असा सवाल देखील मुश्रीफ यांनी विचारण्यात आला. तर त्याला मुश्रीफ यांनी बेधड उत्तर देत म्हटले की, “स्पर्धा दोन आणि तीन त्यांच्यामध्ये आहे. बघू या आता दोन आणि तीन कोण येतोय, असे म्हणाले.

लोकसभेत धनंजय महाडिक यांचे काम केले नाही असा आरोप मुश्रीफ यांच्यावर माडिक यांनी केली, असा सवाल विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उत्तर दिले की, धनंजय महाडिक यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केली, पण आम्ही सांगू सुद्धा लोक ऐकत नव्हती. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नेगटिवीट फार गेली होती, कितीही प्रयत्न केला तरी ते लोक ऐकत नव्हते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र विधिमंडळाचे दिवाळे निघाले! – आशिष शेलार

Aprna

शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान; कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ! – मुख्यमंत्री 

Aprna

“राजे एकत्र आले याचा आनंदच, त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे”, वडेट्टीवारांची अपेक्षा

News Desk