HW News Marathi
महाराष्ट्र

हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या, शिवसेनेची मागणी

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहे. विरोधीपक्षाकडून आंदोलन करून निषेध केला जात आहे.अशात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना द्यावा, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटकरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाबद्दल विनंती केली आहे.

‘देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमधील निर्भयाचा अमानुष बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा गुन्हा मुंबईत दाखल करून मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशला पाठवावे, अशी मागणी सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून तो सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही; 29 तारखेपर्यंत कारागृहातच रहावे लागणार

Aprna

कोल्हापूर विक्रीकर विभागाचे सह आयुक्त संजय माने यांना अटक

News Desk

मुंबईबाहेरच्या लसवंतांनाही रेल्वे प्रवासासाठी खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

News Desk