HW News Marathi
महाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं, भाजपचा हल्लाबोल

मुंबई | भाजपच्या शिष्टमंडळानं आज (२४ मार्च) फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्याला वाचवणं गरजेचं आहे त्यामुळेच राज्यपालांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी विनंती आम्ही केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे असा टोला लगावला. तसेच त्यांनी काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही म्हटलं आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला,” असंही फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतायत. इथले नेते वेगळं बोलतायत. केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,” असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला. पुढे बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारताना, काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे या बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ही आमची मागणी असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्यपाल काही ठोस पावलं उचलणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

Aprna

राजकीय नेत्यांसंबंधी केलेलं ‘ते’ वक्तव्य बंडातात्यांना भोवलं; पोलिसांनी घेतलं ताब्यात

News Desk

बिहार विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

News Desk