HW News Marathi
महाराष्ट्र

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खा. अशोक चव्हाण

मुंबई | पुरंदरचे माजी आमदार चंदू काका जगताप यांच्या निधनाने एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
चंदू काका जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून खा. चव्हाण म्हणाले अत्यंत गरीबीतून व कष्टातून चंदूकाका जगताप यांनी प्रगती केली. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ होते. १२ वर्ष सासवडचे नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक, विधान परीषदेचे आमदार, राज्य सहकार परीषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. संत सोपानकाका सहकारी बँक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था, पुरंदर मिल्क कंपनीची स्थापना करून त्यांनी सहकारक्षेत्रात भरीव कार्य केले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थाची उभारणी करून ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.
चंदू काका जगताप यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

News Desk

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna

केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा न दिल्याने महाराष्ट्रासोबत देशातील अन्य राज्यांमधील ओबीसींचे आरक्षण अडचणीत! – छगन भुजबळ

Aprna
राजकारण

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण

News Desk

मुंबई | जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून खा. चव्हाण म्हणाले की, एका ८४ वर्ष वयाच्या शेतक-याला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. मंत्र्यांना त्यांनी निवेदने ही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही. तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

जे.जे. रूग्णालयात ते सहा दिवस मृत्यूशी झुंज देत होते पण मुंबईत असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रूग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करण्यास वेळ मिळाला नाही हे दुर्देवी असून सरकारची असंवेदनशीलता दर्शवणारे आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षात साडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. शेतक-यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याची टीका अन् निलंबन

News Desk

महाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन, पवार ‘शकुनीमामा’ तर राहुल रा’फूल’ !

News Desk

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk