HW News Marathi
महाराष्ट्र

डॉक्टरांच्या कार्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला सलाम

मुंबई | कोरोनाचे वादळ जगभरात घोंघावच असताना मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर संपूर्ण आरोग्य विभागाने धनुष्यबाण पेलल्यासारखे या युद्धाशी लढण्यास सुरुवात झाली. कोरोनाबाधितांना बरे करण्यासाठी रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टरांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानले आहे.

एखाद्या लढाईत आघाजीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आत्तापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढत आहात असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले यात डॉक्टरांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी या पत्रात नमुद केले आहे.

पत्राच्या शेवटी त्यांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आणि सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा केला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी आपली लढाई अशीच सुरु ठेवू या. मीच माझा रक्षक या संदेशाचे पालन करुयात आणि तुम्ही सर्वांनी स्वताची काळजी घ्या. काही सूचना असतील तर त्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा असेही त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये कशाचा कशाला धागाच जुळत नव्हता – चंद्रकांत पाटील

News Desk

कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे – अस्लम शेख

News Desk

मोठी बातमी! राज्यातील १०वीची परीक्षा रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk