HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावातील नागरिकांचे केले स्थलांतर

कोल्हापूर | महाराष्ट्राला पावसाने चांगलचं झोडपलं आहे. कोकणात, कोल्हापूरमध्ये पावसाने कहर मांडला आहे. कोल्हापुरात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने काल रात्री धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 110 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीची इशारा पातळी 39, तर धोका पातळी 43 फूट आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा वेग कायम राहिल्यास पुन्हा एकदा हाहाःकार उडण्याची भीती आहे. एनडीआरएफच्या टीमकडून चिखली येथील नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, सूचनांचं पालन करावं

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना शक्य असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन केलंय.

ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात पावसाचा हाहाःकार पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे कोवाड बाजार पेठेत पाणी शिरलं असून व्यापारी चिंतेत आहेत. जांबरे धरणातून 3 हजार 115 क्युसेक, तर घटप्रभा धरणातून 15616 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी रात्री 11 वाजता पाणीपातळी 30 फुटांवर गेली. सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरल्यामुळे 15 घरांमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले.

त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

जळगावात हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. हातनुर धरण क्षेत्रातून 1 लाख 30 हजार 665 क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग धरणातून सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी नदी आणि पूर्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे हातनूर पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळेच सर्वच 41 दरवाजे पूर्णपणे उघडले, अशी हातनुर धरण प्रशासनाने माहिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

News Desk

फडणवीसांनी ‘आमचे मार्गदर्शक’ असा बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत केले ट्विट 

News Desk

सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी! – डॉ.राजेंद्र शिंगणे

Aprna