HW News Marathi
Covid-19

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२५ जुलै) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवारांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. “कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण ५ ते ६ राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे, त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे”, असे म्हणत शरद पवारांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

“मालेगांव धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल. कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. कोरोना प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसांवरून ३० दिवसांवर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल”, असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले आहे.

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

“केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही. त्यामुळे आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा आहे. राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, अशीही माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.

खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार !

“खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे. त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल”, असा इशाराही यावेळी शरद पवारांनी दिला आहे. “कोरोना या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जबाबदारीने लक्ष घालत आहेत. लोकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे”, असेही शरद पवार यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील पहिलेच आमदार! निलेश लंकेचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ कडून सन्मान

News Desk

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत ठरवली !

News Desk

चिंताजनक ! दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

News Desk