HW News Marathi
महाराष्ट्र

दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ!

नवी मुंबई | मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना सध्या भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढली आहे. काल मार्केटमध्ये एकूण ५९६ गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या, मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून कालपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी १० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

सध्या बाजारात भेंडी २० ते ३० रुपये, कोबी १० ते २० रुपये, मिरची ४० ते ५० रुपये, विकली जात असून टोमॅटो २० ते ३०, वांगी ३५ ते ४० तर कोथिंबीर १० ते २५ रुपये दराने विकली जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये लॉकडाऊनमुळे 300 ते 400 वाहनांची आवक होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून 500 ते 550 जवळपास गाड्यांची आवक असल्याने भाजीपाल्यांचे दर ढासळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य

Aprna

मीरा भाईंदर महापालिका जिंकण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगले

News Desk

विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, राऊतांचा टोला

News Desk