HW News Marathi
महाराष्ट्र

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला खडसावलं

मुंबई | मुंबईत निर्बंध शिथिल झाले असून अजूनही लोकलसाठी परवानगी मिळालेली नाही. दरम्यान मुंबई हायकोर्टाने बसमधली गर्दी चालते तर मग लोकलमधील गर्दी का नाही? अशी विचारणा राज्य सरकारला केली आहे. तसंच लशीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा असा सल्लाही दिला आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला पुढील गुरुवारी यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

लोकलमधून संसर्ग होणार नाही का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल बंद ठेवण्यात आले आहेत. “बस आणि अन्य सार्वजनिक वाहनांतून गर्दीने प्रवास चालू शकतो. मग लोकलमधून का नाही. तिथे संसर्ग होणार नाही का?,” असा प्रश्न करत हायकोर्टाने लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक आणि पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा असा सल्ला दिला. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत. लोकल प्रवास ही मुख्य गरज आहे असंही यावेळी हायकोर्टाने नमूद केलं आहे.

संयम सोडू नका

मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध जरी शिथिल केले आहेत तरी लोकलसाठी मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही. हायकोर्टने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे लोकल प्रवास सुरु करण्यासाठी मागणी केली आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदा पॉसिटीव्ह प्रतिक्रिया आली आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्योग व स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याद्वारे गरजू घटकांना सक्षम बनवावे! – धनंजय मुंडे

News Desk

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

News Desk

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर एनडीएमध्ये सहभागी

News Desk