HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीत लोडशेडींगला सुट्टी 

मुंबई – लोडशेडींग मुळे संपूर्ण राज्याला आंधाराचा सामना करावा लागणाऱ्यांना काही काळ दिलासा मिळणार आहे. दिवाळी मध्ये राज्यात कुठेही लोडशेडींग होणार नसल्याचा दावा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात जे लोडशेडींग होते ते तात्पूरते होते. कोळसा टंचाई मुळे ही स्थिती उद्भवली होती. त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला होता. मात्र आता ही स्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळीत राज्यातील प्रत्येक घरात प्रकाश असेल असेही त्यांनी सांगितले.

राज्याला आवश्यक असणारा कोळसा सध्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत राज्यातील लोडशेडिंग बंद आहे आणि पुढेही ते बंद राहील असेही त्यांनी सांगितले. शेतीसाठी सलग ८ तास तर गावांसाठी २४ तास पुरवली जाते तीच स्थिती यापुढच्याही काळात असेल. त्यामुळे दिवाळीत कोणालाही लोडशेडींगचा सामना करावा लागणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही,’ अशोक चव्हाण

News Desk

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, सेनेचा खोचक सल्ला 

News Desk

कंगणाला महाराष्ट्रात आणि मुंबईत राहण्यातच अधिकार नाही – गृहमंत्री

News Desk