HW News Marathi
Covid-19

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना ३ महिन्यांचे अनुदान आगाऊ मिळणार

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल १२७३ कोटी २५ लाख रुपयांचा आगाऊ निधी आज (२७ एप्रिल) तातडीने वितरित करण्यात आला आहे. कोरोनामुळे उत्पन्नात घट असतानाही समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात २७२३ कोटी ४९ लाखांची तरतूद केली होती. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. मात्र, वंचित घटकांना फटका बसू नये यासाठी एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांच्या अनुदानाची तब्बल १२७३ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम सामाजिक न्याय विभागाला आज आगावू देण्यात आली. येत्या काही दिवसात ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्याचा स्वत:च्या तिजोरीतून मदत करण्याचा निर्णय

केंद्र शासनाकडून अवघे १३० कोटी प्राप्त झाले असताना राज्य शासनाने स्वत:च्या तिजोरीतून ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार योजनेतून राज्यात, ११ लाख १५ हजार लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये, श्रावणबाळ सेवा योजनेतून ११ लाख ७२ हजार लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये मानधन राज्य शासनाकडून दिले जाते. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत ६५ ते ७९ वयोगटातील दहा लाख ७३ हजार लाभार्थींना प्रतिमहिना एक हजार रुपये मानधन देण्यात येते. यामध्ये ८० टक्के म्हणजेच प्रतिव्यक्ती आठशे रुपये हिस्सा राज्य शासनाचा असतो. वय ८० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या ६८ हजार तीनशे लाभार्थींना प्रतिमहिना १ हजार रुपये देण्यात येतात. त्यापैकी, ५० टक्के म्हणजे पाचशे रुपये राज्य शासन देते.

लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम लवकरच जमा होईल

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या ७० हजार पाचशे लाभार्थीं आहेत. त्यांना प्रतिमहिना १ हजार रुपये दिले जातात. त्यातील ७० टक्के म्हणजे प्रति लाभार्थी ७०० रुपये राज्य सरकार देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे राज्यात १० हजार तीनशे लाभार्थीं असून त्यांच्या प्रतिमहिना १ हजार रुपये मानधनांपैकी ७० टक्के रक्कम राज्य सरकार देते. कोरोनामुळे सुरू संचारबंदीच्या काळात नागरिकांना बाहेर पडावं लागू नये यासाठी एप्रिल, मे व जून य तीन महिन्यांचे मानधन एकत्रित देण्यात येणार आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम सामाजिक न्याय विभागातर्फे लवकरच जमा होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेश टोपे यांचे पोलीस प्रशासनाला निर्देश, मंठातील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा

News Desk

अनिल देशमुखांना CBIकडून समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी

News Desk

Lockdown Extended | ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन !

News Desk