HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षासाठी आयुष्य वेचलेले सत्ते बाहेर तर राणें सारखे मंत्री कसे होतात ?

खडसेंचा पक्षनेतृत्वाला सवाल, राणेंवरही टिका

धुळे – ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलं. सत्ता आणण्यासाठी जावाचं रान केलं. असे नेते सत्ता आणि पक्षा बाहेर आहेत. तर नारायण राणें सारखे मोठ्ये त्यागी नेते पक्षा बरोबर येत आहेत. त्यांना मंत्रीपद दिले जाणार आहे. अशा बोचऱ्या शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावरच पून्हा एकदा जाहीर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी ही नाराजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम जाजू यांच्या समोर व्यक्त केली त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त होत आहे. ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतच धुळ्यात झालं त्यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. खडसे यांनी जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा तेंव्हा आपल्या भावनाना वाट करून दिली. त्यात आता नारायण राणेंच्या मंत्री मंडळ प्रवेशही त्यांना पटलेला नाही.

राणें सारखे सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणारे नेते मंत्रीमंडळात आणि आपण बाहेर ही बाब खडसेंना पटलेली नाही. त्यामुळेच त्यांनी ही टिका केली आहे. “आमच्या पक्षामध्ये असं झालंय की, ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू साहेबांसमोर सांगतोय.”, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. शिवाय ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षण देणाऱ्याचीच उरल्याचा टोला त्यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वाला लगावला. जून २०१६ पासून खडसे मंत्रीपदापासून दूर आहेत. भोसरी जमिन घोटाळा प्रकरणी त्यांचा राजिनामा घेण्यात आला आहोता. आता पून्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे या निमित्ताने आपल्याला संधी मिळेल का याचीच प्रतिक्षा खडसे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझी हत्या करण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन!; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Aprna

“तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येतात म्हणून राज्यात कोरोना वाढतोय का?”

News Desk

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयामुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार! – अजित पवार

Aprna