HW News Marathi
महाराष्ट्र

विजेचा धक्याने शेत-यांचा मृत्यू

चाळीसगाव रानडुकरांपासून पिकांचे रक्षण व्हावे, यासाठी शेताच्या भोवती लावलेल्या तारांमध्ये सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून दोन तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ओढरे (ता. चाळीसगाव) शिवारात घडली. या घटनेत एका बैलाचाही मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत माहिती अशी, पाटणादेवी गावाजवळील ओढरे (ता. चाळीसगाव) शिवार हा जंगलालगतचा भाग आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतांमध्ये रानडुकरांचे कळपच्या कळप शेती पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यापासून बचाव म्हणून आप्पा जाधव व बळीराम जाधव यांच्या शेताच्या बांधावर तारा लावून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आलेला होता. आज दुपारी चारच्या सुमारास योगेश प्रल्हाद राठोड (वय 30) व दत्तू रतन राठोड (वय 32) हे तरुण शेतकरी गुरे चारण्यासाठी या शिवारात आलेले होते. दुपारी पावसाच्या पाण्याचा शिडकावा पडल्यानंतर चारच्या सुमारास हे दोघेही आपल्या सोबतची बैलजोडी घेऊन घराकडे परत निघाले. शेताच्या बांधजवळ रानडुकरांसाठी शेतकऱ्यांनी विजेचा प्रवाह असलेल्या तारा अंथरल्या होत्या. त्याची माहिती या दोन्ही शेतकऱ्यांना नसल्यामुळे या तारा त्यांच्या संपर्कात आल्याने सुरवातीला योगेशला शॉक लागला. त्याच्यासोबत असलेल्या बैलालाही शॉक लागल्याने दोन्हीही तारेला चिकटले. हा प्रकार जवळच असलेल्या दत्तूच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देखील शॉक लागला व दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. अशातच एक बैल वीज प्रवाहापासून दूर राहिल्याने बचावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्या पाहाव्यात”, नवनीत राणांचा घणाघात!

News Desk

गोपीचंद पडळकर आज भाजपमध्ये, काँग्रेसच्या ६ आमदारांचा प्रवेश लांबणीवर

News Desk

१० वी १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग प्रायोगिक तत्वावर सुरू होणार

News Desk