HW News Marathi
महाराष्ट्र

“किती दिवस तुम्ही शरद पवार साहेबांचा आधार घेणार?”- बाळासाहेब थोरात

अहमदनगर। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसतायेत,आणि अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार यांच्यावलर जास्त हक्क सांगू नये. किती दिवस तुम्ही शरद पवार साहेबांचा आधार घेणार? असं मिश्किल वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय. श्रीगोंदा येथील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलंय.

जयंत पाटील साहेब तुमचे आभार, तुम्ही हा प्रश्न मान्य केला

स्त्री याच वेळी व्यासपीठावरून बोलताना बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्याच्या उभारणीत योगदान असलेल्या नेत्यांचे आभार मानले. मात्र, विठ्ठलराव विखे-पाटील, बाळासाहेब विखे-पाटील यांचं नाव घेणं त्यांनी टाळलं. अहमदनगर जिल्हा खूप मोठा आहे. तीनशे किलोमीटर लांबी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याला अनेक नेत्यांनी एक ठेवलं. कोण मोडत असेल तर त्याल उभं करणारी माणसं नगर6 जिल्ह्यात होती, असं थोरात म्हणाले. श्रीगोंदा तालुका हा संपन्न तालुका आहे. या तालुक्याइतके पुढारी आणि कार्यकर्ते कुठेही नसतील. कुकडीचे पाणी हा आमचा महत्वाचा प्रश्न आहे. जयंत पाटील साहेब तुमचे आभार, तुम्ही हा प्रश्न मान्य केलाउ. जयंत पाटील यांनी बंदीची आपल्यासाठी जास्त सोडली आहे, असंही थोरात म्हणाले.

शरद पवारांचे आश्वासन

आज नव्या वर्षाच्या सुरुवातीचा पहिला दिवस आहे. आज बापूंची आठवण करण्याचा दिवस, त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपण एकत्र आलो. बापूंच्या डोक्यावर टोपी कधीच असायची नाही. पण इथे पुतळ्यावर टोपी आहे. पण हा पुतळा पाहून साक्षात शिवाजीराव नागवडे उभे आहेत असं वाटतं. माझा नातू रोहित पवारने कर्जत-जामखेडच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली. येत्या दोन ते तीन आठवड्यात बैठक घेऊन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, असं आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत गठित पथकाच्या माध्यमातून अनिष्ट विधवा प्रथा निर्मूलनसाठी प्रयत्न करा! – यशोमती ठाकूर

Aprna

“फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत,” कॉंग्रेसचा गंभीर आरोप

News Desk

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार !

News Desk