HW News Marathi
महाराष्ट्र

उच्च, सर्वोच्च न्यायालयसह निवडणूक आयोगाकडून काही अपेक्षा नाही !

कोलकत्ता | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज (३१ जुलै) भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये ईव्हीएम विषयी सखोल चर्चा झाल्याची माहिती त्यांनी सांगितले. “मला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही.” असे राज ठाकरे म्हणाले

“मी आज ममता बॅनर्जींची भेट घेऊन निवडणुकीतील ईव्हीएम मुद्यावर चर्चा केली. मी त्यांना मुंबईत ईव्हीएम विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध असल्याचे ममतांनी आपल्याला सांगितले. मी तुमच्याबरोबर आहे असे समजा, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.”

ईव्हीएम नको, बॅलेट पेपर आणा, अशी मागणी मनसेने केली आहे. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी राज ठाकरे विरोधकांची भेट घेत आहेत. राज ठाकरे पुढे असे म्हणाले की, “मला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही.” राज ठाकरे आणि बॅनर्जी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगूल लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडी सरकार लोकविरोधी सरकार आहे – देवेंद्र फडणवीस

News Desk

राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे !

News Desk

विहिरीत पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या मातेचा बुडून मृत्यू

News Desk