HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू, तर सरकार कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के

मुंबई | संकट गंभीर असले तरीही सरकार खंभीर आहे, असा धीर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे. राज्यात आज (२२ मार्च) मध्य रात्रीपासून नाईलाजाने १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमत्र्यांनी केली. या काळात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कालपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या २५ टक्के होती. ती आज कमी करत ५ टक्के सरकारी कर्मचारी काम

राज्यातील रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत. राज्यात फक्त आणि फक्त शहरी भागातील बस सेवा सुरू असणार आहे. ही बस सेवा, जीवनावश्यक वस्तूची न आण, जीनावश्यक सेवांसाठी नेआण करण्यासाठी ही सेवा सुरू असणार आहे. अवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

भाजी पाला, वीज पुरवठा करणआर कार्यलय, बँक आणि त्यांच्या संबधित, आर्थिक व्यवहार चालणार केंद्र सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पूर्व ५० टक्के, काल २५ टक्के केली होती. मात्र आता राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्क्यावर आली आहे. त्यामुळे त्यांच्याव जास्त ताण येणार नाही.

दरम्यान, मुंबईत लोकल सेवा बंद केली आहे. मात्र, राज्यात फक्त बस सेवा सुरू राहणार आहे. या बसमधून आर्थिक व्यवहार करणारे कंपनी, बँका, अन्न पुरवठा करणारे, दुध परविणार आदी जीवनाश्यक वस्तूची ने आण करण्यासाठी सुरू राहणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूचा साठा करू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केला आहे. अन्नधान्य, मेडिकल, बँका हे सर्व सुरु राहणार आहे.

मुख्यमत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू

  • आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झाले आहे.
  • जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
  • महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
  • रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.
  • जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
  • अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
  • बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
  • शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
  • आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
  • ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
  • चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
  • ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल
  • सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद
  • अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती
  • पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : चारीही आरोपींना एकत्रित फाशी देण्याच्या याचिकेवर ११ फेब्रुवारीला सुनावणी

swarit

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार! – राजेश टोपे

Aprna

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा खोटक टोला 

News Desk