HW News Marathi
Covid-19

परतलेल्या मंजुरांचा स्वीकारण्यास राज्यांचा नकार, पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे !

मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेले मंजूर आणि कामगार यांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वच्या ज्यादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. पवारांनी ट्वीट करत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

या मंजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याची पवारांनी सांगितले. महाराष्ट्रात अडकेल्या मंजुरांनाच्या मूळगावी नेहण्यासाठी एसटी बस वाहतुकीची व्यवस्था केली आहे. मात्र, महाराष्ट्रातून मूळ गावी केलेल्या मंजुरांना काही राज्यांनी घेन्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहन पवारांनी ट्वीट करत पंतप्रधानांकडे केली आहे.

स्थलांतरित मंजुरांना ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

श्रमिक आणि कामगारांना सोमवारपासून (११ मे) एसटीतून मोफत त्यांच्या गावी नेहण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज (९ मे) दिली आहे. एका बसमध्ये केवळ २२ लोकांना त्यांच्या मूळगावी सोडणार असून ही सविधा १८ मेपर्यंत असल्याची माहिती परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात आढळून आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन घातक – डॉ. रणदीप गुलेरिया

News Desk

निव्वळ महाराष्ट्राची फजिती करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील !

News Desk

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मूळगावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

News Desk