HW News Marathi
महाराष्ट्र

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

सातारा | यंदाच्या लोकसभा निवडणुकांपासूनच देशात ईव्हीएमविरोधी वातावरण आहे. ‘ईव्हीएममध्ये वारंवार आढळून आलेल्या घोळांमुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपर पद्धतीचा वापर सुरु करावा’, अशी मागणी सध्या विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये मोठी तफावत आढळली आहे. तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत कोणतेही भाष्य करत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. जे व्हायच ते होऊ दे, मी राजीनामा देतो. सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या”, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तशीच फेसबुक पोस्टच उदयनराजे यांनी शेअर केली आहे.

“कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत. असे असताना त्या विषयातील तज्ज्ञ नसतानाही न्यायालये ईव्हीएमबाबत आग्रही राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा ?”, असा सवाल देखील उदयनराजे भोसले यांनी या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे. “निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे”, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन, कॉंग्रेसचा इशारा

News Desk

दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर, राणेप्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?

News Desk

सत्तास्थापनेचा घोळ घालायचा,अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी !

News Desk