HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यावर

मुंबई | महाराष्ट्र यंदा मोठ्या दुष्काळ समस्येला तोंड देत आहे. या भीषण दुष्काळामुळे सध्या राज्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर, शनिवारी (२२ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिक तसेच औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे पीक विमा केंद्रांना भेट देणार असून यावेळी ते तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह तिथले शिवसेनेचे स्थानिक नेते आणि अन्य पदाधिकारी देखील उपस्थित असतील.

नाशिकच्या नांदगाव येथील तसेच औरंगाबाद येथील लासूर स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या पीक विमा केंद्राला उद्धव ठाकरे भेट देतील. या पीक विमा केंद्रांची पाहणी करुन झाल्यानंतर उद्धव ठाकरे तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे हे जालन्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जालन्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार !

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : दुसऱ्या टटप्प्याच्या मतदानाला सुरुवात

News Desk

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk