HW News Marathi
महाराष्ट्र

मी निवडणूक लढविणार नाही, आता फक्त पर्वावरणाशी संबंधित प्रश्न सोडविणार! – सुरेश प्रभू

मुंबई | २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली नव्हती, यापुढेही मी आता निवडणूक लढविणार नाही. परंतु मी आता प्रत्येक माणसाशी संबंधित असलेल्या पर्वावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभु यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कणकवलीतील एका मेडाव्या प्रभु त्यांनी हे वक्तव्य केले. 

“आपल्याला हवामान बदलामुळे वादळांची संख्या वाढत असून अवकाळी पाऊस वर्षभर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. मी आता राजकारण विरहीत प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्री करणार असून यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीही मी एसीचा व्यवसाय चांगला चालत असताना राजकारण करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा माझ्या कुटुंबाने मला विरोध केला होता. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी राजकारणात आलो आणि खासदार झाल्याचे त्यांनी अवर्जून सांगितले,” असे प्रभू म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो”- अजित पवार

News Desk

सरासरी राज्य सरकारने वीज ग्राहकांसोबत बनवाबनवी केली – आशिष शेलार

News Desk

मीरा भाईंदर महापालिका जिंकण्याचे शिवसेनेचे स्वप्न भंगले

News Desk