HW News Marathi
महाराष्ट्र

तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ! – गोपीचंद पडळकर

मुंबई | पराक्रमाचा इतिहास बहुजन बांधवांना कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आमचा राजकीय हक्क मागू ते काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचं नाहीये, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. पडळकर म्हणाले, “पानिपतच्या पराभवानंतर स्वराज्याचा भगवा पताका थोरले सुभेदार मल्हाराव होळकर यांनी खांद्यावर पेलला. पानिपतच्या पराभवाचं रुपांतर त्यांनी प्रभावात केले. मुघलशाही आपल्या टाचेखाली घेतली, जिथे ‘मल्हार आया भागो’ म्हणत मुघलांच्या सैनिकांची भांबेरी उडायची, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची ताकद अटकपासून कटकपर्यंत पसरवली. प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या लेखकांनी होळकरांचा दैदिप्यमान इतिहास पुसायची मोहिम चालवली. ते तुम्ही वाफगावच्या किल्ल्यावरून ओळखलेच आहे. हा संघर्षाचा पराक्रमाचा इतिहास जर आम्हा बहुजन बांधवाना परत कळाला तर आम्ही इथली शासनकर्ती जमात होऊ, आम्ही आमचा राजकीय हक्क मागायला येऊ, असे पडळकर म्हणाले.

“काका-पुतण्या धार्जिण्या राजकारण्यांना होऊ द्यायचे नाहीये. बहुजनांनी यांना मुजरा करत दादा-साहेब-युवराज करत राहवे, म्हणजे तुमची जास्तीत जास्त जिल्हापरिषदेवर बोळवण होईल. हा डाव आपण ओळखला पाहिजे. होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सर्व बहुजन धनगर भटक्या ओबीसी बांधवांनी आपला राजकीय न्युनगंड झुगारून आपला अधिकार घेण्याचा प्रण केला पाहिजे. मल्हारावांप्रमाणे मुत्सदीपणा शिकला पाहिजे. ओबीसी भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्काचं, ओबीसी आरक्षणाचं, महाज्योतीचं कुणी पानिपत करणार असेल तर आपण सुभेदार बनून उभे राहूया.” असे पडळकर म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगड किल्ल्यावरील विद्युतीकरणासाठी ६ कोटींचा निधी; भूमिगत वीज वाहिन्यांमुळे रायगडाच्या सौंदर्यावर परिणाम नाही; डॉ.नितीन राऊतांची विधानसभेत माहिती

Aprna

‘स्वाइन फ्लू’ची दहशत, जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी कंबर कसणे आवश्यक !

News Desk

भाजपने एकही जागा न दिल्याने रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

News Desk