HW News Marathi
महाराष्ट्र

६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवच, पडळकरांचा टोला

बारामती | राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. मुख्मंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दौऱ्यावर आहेत. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूरात पोहचले आहेत. ६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज होते, असं असेल तर महाराष्ट्रसाठी दुर्दैव दुसरं काय नाही अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.प्रत्येक वेळेस केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं, मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने केली पण राज्य सरकारने काय केलं हे सांगावं, असं पडळकर म्हणाले आहेत. गेले अनेक दिवस भाजपकडून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत अशी टीका केली जात आहे.

‘शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे’अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागचा दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकर यांचे वर्चस्व

Aprna

नामांतरणाच्या मुद्यावरून दादर स्थानकाबाहेर भीम आर्मीचे आंदोलन

News Desk

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

swarit