HW News Marathi
देश / विदेश

शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता !

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर तिथल्या तिथेच राजीनामा दिला असता. महाराजांचा कोणत्याही प्रकारे अवमान झालेला नाही. मात्र, यावरून जे राजकारण सुरु आहे त्यासारखी हास्यास्पद गोष्ट नाही. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचे वर्तन चुकीचे नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले आहे.

उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (२२ जुलै) राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यावेळी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर उदयनराजेंनी “जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी”ची घोषणा दिली. त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. या प्रकारामुळे राज्यातील राजकारण पेटले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजपने पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी करावी मागणी अशी मागणी आता जोर धरत असताना आता स्वतः उदयनराजेंनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

व्यंकय्या नायडू उदयनराजेंना काय म्हणाले ?

भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी’ची घोषणा दिल्यानंतर व्यंकय्या नायडू म्हणाले कि, “हा शपथविधी सोहळा राज्यसभेत नाही तर माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतले जात नाही. सभागृहात अशा कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. तुम्ही नवीन सदस्य आहेत. त्यामुळे भविष्यात हे लक्षात ठेवावे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांच्या आधीच सोनिया गांधी यांनी दिला भारतीयांना संदेश

News Desk

वीर सावरकरांवरील काँग्रेसच्या आक्षेपार्ह मजुकरावरून भाजपची आक्रमक भूमिका

News Desk

दाभोळकर हत्या प्रकरण | दुसऱ्या राज्याच्या तपासावर अवलंबून का राहता ?

News Desk