HW News Marathi
महाराष्ट्र

वेळ पडली तर सरकार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्जही काढेल !

मुंबई | “प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वेळ पडली तर राज्य सरकार त्यासाठी कर्ज देखील काढेल”, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या ३ जिल्ह्यांना बसला आहे. सांगली, कोल्हापूर, साताऱ्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे येथील लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. या भागातले पाणी जरी हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली असली तरीही त्यानंतर भागात निर्माण होणारे आव्हान त्यापेक्षाही मोठे आहे. पहिले आव्हान पूरानंतर येणाऱ्या रोगराईचे तर दुसरे आव्हान या घरदार, संपूर्ण संसार उध्वस्त झालेल्या या लोकांच्या डोक्यावर छप्पर देणे.

राज्यातील या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या एकूणच भूमिकेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या मंत्र्यांची असंवेदनशीलता, मदतीपेक्षा जाहिरातबाजीवर दिलेला अधिक भर, राज्य सरकारच्या परिपत्रकातील निकष अशा अनेक मुद्द्यावरून सध्या राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यानंतर आता “वेळ पडली तर राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्ज देखील काढेल”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “राज्यभरात पूरग्रस्तांसाठी ५०० हुन अधिक निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. जवळपास ३ लाखापेक्षा अधिक लोकांना या निवारा केंद्रात आसरा देण्यात आला आहे. पूराचा फटका बसलेल्या गावांचे पुनर्वसन होण्यास ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागेल”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार नव्हे तर शरद पवारच पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट

News Desk

सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील! – अजित पवार

Aprna

विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन

Gauri Tilekar