HW News Marathi
महाराष्ट्र

आमची सत्ता आली तर मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू !

औरंगाबाद | “आमची सत्ता आली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना २ दिवसांसाठी तुरुंगामध्ये टाकू”, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर हे औरंगाबाद येथे मुस्लिम समाज कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.”बिहारमध्ये एका खासदाराला एके 47 बाळगल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले आहे. मग मोहन भागवत यांच्याकडे देखील एके 47 आहे. मोहन भागवत यांच्याकडे एके 47 कुठून आली ?”, असा सवाल प्रकार आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

“सामान्यांना जो न्याय लागू आहे तोच न्याय संघाच्या लोकांना देखील लागू झाला पाहिजे. आपल्याकडे एके ४७ कुठून आली ? कशी आली ? याबाबत जर मोहन भागवत स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत तर आम्ही त्यांनाही तुरुंगात पाठवू”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संघासह काँग्रेसवर देखील टीका केली आहे. आम्ही लोकसभेत अनेकदा काँग्रेसचा पराभव झालेल्या जागा मागितल्या होत्या. मात्र, काँग्रेसने ते नाकारत सेक्युलर मतदान दाबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवार कुंटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत -सुप्रिया सुळे

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

“१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन”, हसन मुश्रीफ यांची माहिती

Aprna