HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगाव सीमाप्रश्नावर कर्नाटक-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी !

बेळगाव | बेळगाव सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येऊपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. बेळगावमधील कानडी लोक मराठी माणसांवर अन्याय होता आहेत. महाराष्ट्रातही कानडी लोक राहतात. तरिही महाराष्ट्राने नेहमी त्यांना मदतच केली आहे. मात्र, बेळगावमध्ये मराठी नाटकांवर अधिक कर लादण्याचा प्रकार होत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी बेळगावमध्ये आज (१९ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.

बेळगवाच्या जनतेने ७० वर्षे फार संघर्ष केला. प्रसंगी हौतात्म्य पत्करले. पोलीस केसेस झाल्या, डोकी फुटली. त्यामुळे आता या प्रश्नावर उद्धव ठाकरे आणि येडियुरप्पांशी चर्चा करतील. या प्रश्नावर सध्या तातडीने एक बैठक होऊन काहीतरी निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच या भागातील मराठी भाषिक जनता सूटकेचा श्वास घेईल, असे राऊत यावेळी बोलले. दरम्यान, राऊत पुढे म्हणाले की, बेळगाव सीमा प्रश्न हा न्यायालयात प्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर राजकीय भाष्य करणे, योग्य नसल्याचे राऊत ते यावेळी म्हणाले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या राम मंदिराचा प्रश्न सुटला तर मग बेळगाव सीमा प्रश्न देखील सुटले अशी आशा राऊतांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने बेळगावचा खटला लढण्यासाठी हरिश साळवे यांची नियुक्ती केली आहे. ते जगातील सर्वोत्कृष्ठ वकील आहेत. आता तर त्यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणूनही नियुक्ती झाली आहे.

बेळगावामध्ये मराठी सिनेमांवर जास्त करवाद

“या भागात मराठी नाटक, सिनेमे यांच्यावर अतिप्रमाणात करवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी नाटक आणि सिनेसृष्टीतील येथे येत नाहीत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकेर येडियुरप्पांशी बोलत आहेत. शेवटी हा सांस्कृतिक विषय आहे. आता मुंबईमध्ये कर्नाटक संघ आहे. त्यांचा हॉल आहे. सगळे आमचे कानडी बांधव चालवतात. त्यांची नाटके, त्यांच्या संस्थांना आम्ही अनुदान देतो. त्यांच्या शाळांना आम्ही अनुदान देतो. आमच्या मनामध्ये काही नाही, कर्नाटक सरकारनेही तसे काही ठेऊ नये. हा प्रश्न आता सामोपचाराने सूटला पाहिजे.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

News Desk

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ!

News Desk

फडणवीसांना अटक करा, रूपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk