HW News Marathi
Covid-19

आता पुन्हा मुंबईला येणार नाही !

नाशिक | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरातील परप्रांतीय अडकून राहिले. या परप्रांतीयमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यातील लोकांची संख्या जास्त आहेत. लॉकडऊन आणि कोरोनामुळे यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली. यामुळे आता आयुष्यात परत मुंबईला येणार नाही, मुंबईपेक्षा आपला गावच बरा असे म्हणण्याची वेळ या मजुरांवर आले आहे. मुंबईहून पायीच गावाकडे निघालेल्या या परप्रांतीय मजुरांचे लोंढे मुंबई-आग्रा महामार्गावर दिसतात.

मुंबई, पुणे आणि ठाणे येथून निघालेले हे मंजूर पायीपीट करत मध्य प्रदेश, इंदूर, पंजाब, इलाहाबाद, राजस्थान जाण्यासाठी पायीच निघाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या मंजुरांना नाशिक शहर पोलिसांनी शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर दूर जाऊन थांबा असे सांगितले. त्यामुळे मजुरांनी ओझर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावरील सायखेडा फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली तात्पुरता निवारा घेतल्याचे चित्र पाहायाल मिळाले.

या पुलाखाली तब्बल दोनशे परप्रांतीयांनी थांबले असून या लोकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. हे सर्वजण त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहन मिळेल ?, प्रवास सुखरुप होईल?, घरी लवकरत लवकर पोहचता येईल का?, अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत आहेत. या परप्रांतीय मंजुरांना ओझर येथील सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी जाऊन त्यांना बिस्कीट पुडे, पाणी देत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आसामच्या विविध भागात भूस्खलनाच्या घटना, २० जणांचा मृत्यू

News Desk

ICMRच्या यादीमध्ये ‘कोरोनिल’चा साधा उल्लेख नाही, तरीही केंद्रीय मंत्री निर्धास्तपणे वाटताहेत बाबा रामदेवांचं ‘हे’ औषध

News Desk

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

News Desk