HW News Marathi
महाराष्ट्र

निर्मला सितारमण यांच्या ‘या’ महत्त्वाच्या मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोदींच्या निर्णयानंतर देशाला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागणार आहे. या पाश्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आणि राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेद्वारे मोठ्या घोषणा केल्या आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांची काळजी घेणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचारी यांचे निर्मला सितारमण यांनी आभार मानले. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरभिततेसाठी कर्मचाऱ्यांना ५० लाखांच्या विम्याचे कवच सरकार देणार आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, इतर वैद्यकीय कर्चाऱ्यांचा समावेश आहे. याचा फायदा २० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत १ लाख ७० हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

निर्मला सितारमण यांच्या महत्वाच्या घोषणा

 

  • कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचा सामना करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिक आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.
  • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून पुढील ३ महिने ८० कोटी लोकांना दर माणसी ५ किलो तांदूळ किंवा गहू देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये आणखी ५ किलोंची वाढ करण्यात आली आहे. तसेच १ किलो डाळही देण्यात येणार आहे.
  • मनरेगातून ५ कोटी कुटुंबांना महिना २ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील मनरेगाच्या नागरिकांना मिळणारी बिदागी १८२ रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.
  • जनधन योजनेंतर्गत २० कोटी महिला खातेधारकांना महिना ५०० रुपये देण्यात येणार.
  • उज्ज्वला योजनेंतर्गत ८.३ कोटी बीपीएल कुटुंबीयांना पुढील तीन महिने तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत.
  • वृद्ध, दिव्यांग, पेन्शनधारकांना पुढील तीन महिने १००० रुपये देण्यात येणार आहेत. ३ कोटी लोकांना फायदा.
  • बचत गटाच्या महिलांना कोणतीही संपत्ती तारण न ठेवता मिळणारे कर्ज दुपटीने वाढविले. आता २० लाखांचे कर्ज मिळणार. ७ कोटी महिलांना फायदा.
  • सरकार पुढील तीन महिने खासगी नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्याचा भाग असे दोन्ही २४ टक्के टाकणार आहे. यासाठी ही कंपनी १०० पेक्षा कमी कर्मचारी आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५००० पेक्षा कमी असायला हवा.
  • कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के नॉन रिफंडेबल अॅडव्हान्समध्ये पैसे काढू शकणार आहेत. किंवा तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम काढू शकणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे !

News Desk

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk

मांस खाणाऱ्यांच्या हाताने मंदिरे का उघडू? मंदिरांवरून खैरे-जलील वाद शिगेला…

News Desk