HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १०वी-१२वी परीक्षेदरम्यान वर्गात कमीत कमी विद्यार्थी बसवण्याचा निर्णय

चंद्रपुर | राज्यात एकीकडे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आहे तर दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना या सरकारकडून आणि आरोग्यविभागाकडून वेळोवळी आखल्या जात आहेत. सध्या सुरु असलेल्या परीक्षेदरम्यान एका वर्गात कमाल बारा विद्यार्थी बसवले जात असून त्यांच्यातील अंतर निर्देशानुसार कायम ठेवले जात आहे. यामुळे शाळांनाही परीक्षेसाठी अधिक वर्गखोल्या उपलब्ध करुन द्याव्या लागत आहेत. वाढीव संख्येतील शिक्षक आणि स्टाफची परीक्षा कामासाठी नियुक्ती करावी लागत आहे. ही सर्व योजना कोरोनाचा प्रसार रोखण्याकरता करण्यात येत आहे.

दरम्यान टाळता न येण्यासारख्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी कोरोना विषाणूजन्य आजाराच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पावले उचलली जात आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन मात्र याबाबत योग्य ती काळजी घेत आहे. परदेशातून परतेल्या प्रवाशांनी स्वत:१४ दिवसांसाठी सेल्फ कोरोंटाईनमध्ये राहण्याचे आदेश सरकारने दिले आहे. सद्यस्थितीला महाराष्ट्रात एकूण ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच, महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या फेज २ मध्ये आहे. यातून पुढे जाऊ नये म्हणून प्रशासन शक्यती काळजी घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

swarit

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान!

News Desk

मराठा आणि ओबीसी समाजात सरकारला भांडणं लावायची आहेत, विनायक मेटेंचा गंभीर आरोप

News Desk