HW News Marathi
Covid-19

औरंगाबदमध्ये आजपासुन सुरू होणारा लॉकडाऊन रद्द

औरंगाबाद | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये आजपासून (३१ मार्च) सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली.

या आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आजपासुन (३१ मार्च) लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र काल (३० मार्च) जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.

रात्रीची संचारबंदी कायमरात्री

रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत असलेली संचारबंदी ‘जैसे थे’ असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे नेहमीसारखे रात्री ८ वाजता दुकाने बंद करावी लागतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन अखेर ‘कोरोनामुक्त’, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के, तर मृत्यूदर ४.६९ टक्क्यांवर । राजेश टोपे

News Desk

युपीच्या लोकांना घेण्यास मुख्यमंत्री योगी टाळाटाळ करत आहेत !

News Desk