HW News Marathi
महाराष्ट्र

इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन रद्द होताच केला जल्लोष, कोरोनाचे मोडले नियम

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आजपासून (३१ मार्च) लॉकडाऊन लागू होणार होता. मात्र, काल (३० मार्च) बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तो रद्द केला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन रद्द झाल्याने जल्लोष केला होता. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली. यावेळी इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला होता.

एकीकडे औरंगाबाद शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हजारांच्या घरात गेली असताना आणि मृतांचा आकडा थेट चाळीसवर पोहोचला असताना, खुद्द खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेला जल्लोष अत्यंत धोकादायक समजला जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यातून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात शिवशाही-खासगी बसमध्ये धडक, ५० जण जखमी

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk

ज्यांच्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो आणि नाईट लाईफमध्ये खुलतो ते… 

News Desk