HW News Marathi
महाराष्ट्र

डोवालांवर आरोप करत देशमुखांचे ‘फेसबुक लाईव्ह’ रद्द, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज (८ एप्रिल) दुपारी चारच्या दरम्यान महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांनी प्रसिध्दी पत्रकातून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर विविध आरोप करत आपले फेसबुक लाईव्ह रद्द केले. गृहमंत्र्यांनी लाईव्हीमध्ये दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला परवानगी देणे, अजित डोवाल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवले आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त यासारखे प्रश्न उपस्थिती करत डोवाल यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला.

देशात लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्टवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. तसा प्रयत्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही केला. मात्र, त्या आधीच राजकीय धुरळा उडवून त्यांनी फेसबुक लाईव्ह रद्द केले. अनिल देशमुख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात त्यांनी डोवाल यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग फैलावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकात म्हटले की, “केंद्रीय गृह मंत्रालयाने निजामुद्दीनमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाच्या आयोजनाला परवानगी का दिली, , निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. या आयोजना का थांबवले गेले नाही, याच्यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का,” असा प्रश्‍न असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

“ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भावर सर्व राज्यात झाला. त्याच्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालय जबाबदार नाहीत का ?, अजित डोवाल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवले, हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे आहे, दिल्ली पोलीस आयुक्तांचे असेही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. अजित डोवाल व तबलिगीचे पुढारी मौलाना साब रात्री दोन वाजता मरकजमध्ये अशी काय गुप्त चर्चा करत होते. डोवाल व दिल्लीचे पोलीस आयुक्त दोघांनी या विषयावर बोलायचे का टाळले आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. अजित डोवाल यांना भेटल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मौलाना साब कुुठे फरार झाले व आता ते कुठे आहेत, असा प्रश्‍न करून देशमुख यांनी म्हटले की कोणाशी त्यांचे संबंध आहेत, मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची, प्रोग्रॅमला रोखल नाही तुम्ही, तबलिगशी संबंध तुमचे, या सर्व प्रश्‍नांचे उत्तर कोण देणार,” असा प्रश्‍नही देशमुख यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झोपुच्या ‘आसरा अ‍ॅप‘चा शुभारंभ

Gauri Tilekar

राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराः खा. अशोक चव्हाण

News Desk

महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त लाभला

News Desk