HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, राजेश टोपेंची माहिती

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ११३५ वर पोहोचली आहे. तर आज (८ एप्रिल) तब्बल एकाच दिवसात ११७ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून पुण्यात एकूण मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. “महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपेंनी आज (८ एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले.

दरम्यान, राज्यात रुग्णांची संख्या वाढते, मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे.सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज. मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता.सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले, राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे, असे आवाहन टोपेंनी केली आहे. “जास्त रुग्ण आढळून येत असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे. मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे बंधनकारक केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“राज्यात ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने तालुका स्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक व मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात येणार. या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांना सुरक्षेची आवश्यक साधने पुरविण्यात येणार,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

News Desk

“आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही”, खातेवाटप प्रश्नावर अजित पवारांचा टोला

News Desk

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर अखेर मुख्यमंत्र्यांची सही, राजीनामा राज्यपालांकडे पाठवणार

News Desk