HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

औरंगाबाद | पाण्याच्या अनअधिकृत नळावरुन शुक्रवारी रात्री औरंगाबाद येथे झालेल्या भांडणाचे पडसाद राज्यभर उमटलेले पहायला मिळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी दोन गटात झालेल्या हाणामारी मुळे परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे. सदर ठिकाणी घडलेल्या घटनेत १० पोलिस कर्मचारी तर ३० पेक्षा जास्त सामान्य नागरीक जखमी झाल्याची माहीती मिळत आहे.

  • ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

औरंगाबाद मध्ये 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद रहाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वाल प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : कोवीडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या ! 

News Desk

सुप्रिया सुळेंनी दिल्या भाजप-मनसे युतीसाठी शुभेच्छा !

News Desk

चंद्रकांत खैरे-अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झालेत !

News Desk