HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

औरंगाबाद | पाण्याच्या अनअधिकृत नळावरुन शुक्रवारी रात्री औरंगाबाद येथे झालेल्या भांडणाचे पडसाद राज्यभर उमटलेले पहायला मिळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी दोन गटात झालेल्या हाणामारी मुळे परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी कलम १४४ लागू केले आहे. सदर ठिकाणी घडलेल्या घटनेत १० पोलिस कर्मचारी तर ३० पेक्षा जास्त सामान्य नागरीक जखमी झाल्याची माहीती मिळत आहे.

  • ४८ तास इंटरनेट सेवा रहाणार बंद

औरंगाबाद मध्ये 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद रहाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वाल प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सोनई हत्याप्रकरणी ६ जण दोषी

swarit

रात्री कोरोना असतो का? मनसेच्या प्रश्नाला शिवसेनेने दिले उत्तर

News Desk

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय! अजित पवारांचा फडणवीसांना दणका

News Desk
मुंबई

प्रिन्स हॅरीच्या लग्नानिमित्त डबेवाले वाटणार मिठाई

News Desk

मुंबई : लंडनचे राजकुमार प्रिन्स हॅरी व हॉलिवुड अभिनेत्री मेगन येत्या १९ मे ला विवाह बंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून मुंबईचे डबेवाले मुंबईत मिठाई वाटणार आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांचे लंडनच्या राजघराण्याशी वेगळे नाते आहे. यापूर्वी देखील डबेवाल्यांशी असलेल्या भावनिक नातेसंबंधांचे भान ठेऊन लंडनच्या राजघराण्याने प्रिन्स चार्ल्स यांचे लग्नात मुंबईच्या डबेवालांना लंडनला बोलावले होते. डबेवालेही त्या शाही सोहळ्यासाठी उपस्थित राहीले होते. डबेवाल्यांचे योग्य ते आदिरातित्थ लंडनच्या राजघराण्याने केले होते.

मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरु केलेल्या रोटी बॅन्कच्या माध्यमातून अनेक भुकेलेल्या लोकांना मोफत अन्न वाटप केले जाते. पण १९ तारीखेला प्रिन्स हॅरी व मेगन यांच्या विवाह निमीत्त भुकेलेल्यांना डबेवाल्यांच्या वतिने रोज च्या अन्ना सोबत गोड (मिठाई) देवून त्यांचे तोंड गोड केले जाईल अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.

Related posts

शेतकऱ्यांचा संप मागे

News Desk

अंधेरीतील सरिता इमारतीत घरगुती सिलेंडरचा स्फोट, २ जण जखमी

News Desk

मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर पूरस्थिती.. मुंबईची झाली तुंबापुरी

News Desk