HW News Marathi
महाराष्ट्र

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय! अजित पवारांचा फडणवीसांना दणका

पंढरपूर | राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला आहे.

अजित पवारांनी बोलायला सुरुवात करतानाच म्हटले की, राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नससो. आणि राज्यातील आघाडी सरकार पाडणे म्हणजे काय खेळ वाटतो काय? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिले. काल सायंकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

आजवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी बोलले नव्हते. मात्र आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. आजच्या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या त्याच वक्तव्यावर होता.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या केलेल्या नकलीवर देखील अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो आणि आपला नाद कोणी करायचा नाही आणि केला तर… असे म्हणत गंभीर इशाराही दिला. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेत तुम्ही कुठे, साहेब कोठे…. म्हणत फडणवीस यांना जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी आज चंद्रकांत पाटील यांचा उल्लेखही ‘चंपा’ असा करत ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत सभेची सांगता केली.

मंगळवेढ्यात ३५ गावाच्या पाण्याचा प्रश्न केंद्राचे पैसे आणून सोडवतो या फडणवीसांचे वक्तव्यही राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले असून ते पाणी द्यायला आम्ही समर्थ आहोत, असे उत्तर जयंत पाटील यांनी दिले आहे. केंद्र जे पैसे देते ते राज्याकडून मिळणाऱ्या कराचे असते आणि ते पैसे आमच्या हक्काचा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. सरकार पाच वर्षे टिकणार असून ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून राहणार का? असा सवाल करत फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला होता. त्यामुळे पंढरपूरातील या निवडणूकीत राष्ट्रवादी बाजी मारणार की भाजप हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सलग तीन वर्षे सुट्टीत वृक्ष संवर्धन

News Desk

‘उद्धव ठाकरे इलेव्हन’ दिवाळीपर्यंत तुरुंगात, किरीट सोमय्यांचा इशारा!

News Desk

परळी महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक; नायब तहसीलदारांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन!

News Desk