HW News Marathi
देश / विदेश

ठरलं ! बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार १५० जागा

नवी दिल्ली । संपूर्ण देशभरात सध्या बिहार निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहता महाराष्ट्राचेही या निवडणुकांकडे बारीक लक्ष आहे. त्यातच आता राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडीतील ३ प्रमुख पक्षांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील बिहार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असून एकूण २४३ पैकी १५० जागा लढविणार असल्याची माहिती मिळत आहे.

इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बिहार निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पहिल्या यादीत ३२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, उर्वरित उमेदवारांची नावे बिहारचे पक्षाचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करून पुढच्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत”, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यम प्रभारी कुमार ज्ञानेंद्र यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सुरुवातीच्या काळात खरंतर बिहार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाही आपल्या आघाडीत सामील करून घेणार होती. मात्र, जागावाटपावरून असलेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीने आता बिहारमधून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असा असणार यंदाचा स्वातंत्र्यदिन !

News Desk

सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते, सेनेचा केंद्राला इशारा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जगाला हेवा वाटेल असे स्मारक महाविकास आघाडी उभारणार !

News Desk